अन्य

चांदवड शहरातील घाणीच्या साम्राज्याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

Spread the love

राजेंद्र कोल्हे / प्रतिनिधी, दक्ष पोलीस वार्ता, चांदवड.

                चांदवड शहरातील घाणीच्या साम्राज्याबाबत दि. २० जानेवारी २०२३ रोजी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले व प्रत माहितीसाठी चांदवड उप – विभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

                     चांदवड शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे. शहरात सर्वत्र घाण व कचरा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ठिकठिकाणी घाणेरडा कचरा पडलेला आहे. रस्त्यांच्या कडांना कचरा पडलेला आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. गटार तुडुंब भरलेल्या असल्याने गटारातील कीटक – अळ्या अक्षरशः रस्त्यावर आलेले आहेत. तसेच शहरात घास, गवत देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या गवतांत सर्प फिरतात. डुकरांचा उच्छाद देखील वाढला आहे.

                 शहरात नियमितपणे कचऱ्याची व गटारांची साफ – सफाई करण्यात येत नाही. तसेच मच्छर प्रतिबंधक फवारणीही वेळोवेळी करण्यात येत नाही. यामुळे शहरात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. साफ – सफाई होत नसल्याने शहरात सर्वत्र अस्वच्छता निर्माण झालेली आहे. यामुळे नागरिकांचे व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. लहान मुले सतत आजारी पडत आहेत. शहरात संसर्गजन्य आजारांत वाढ होत आहे. रोगराई पसरत आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया चे रुग्ण वाढत आहेत. शहरात साथीचे आजार देखील वाढलेले आहेत. यामुळे शहरातील जनता अत्यंत त्रस्त झालेली आहे. शहरात कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य वाढल्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे व लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. शहरात काही ठिकाणी मागील २ ते ३ वर्षांपासून गटार साफ करण्यात आलेले नाहीत. शहरात नियमितपणे साफ – सफाई होत नाही. सर्वत्र अस्वच्छता पसरल्यामुळे नागरिकांत संतप्तेचे वातावरण निर्माण झालेले आहे.

                नगरपरिषदेच्या निदर्शनात ही बाब असूनही नगरपरिषद याकडे जाणुनबुजुन दुर्लक्ष करत आहे. नगरपरिषद अधिकारी कचरा, घाणीकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाहीत. नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. लोकांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांकडे प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.

                  चांदवड शहरात नियमितपणे कचऱ्याची व गटारांची साफ – सफाई करण्यात यावी. शहरात वेळोवेळी मच्छर प्रतिबंध फवारणी करण्यात यावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अाहिरे यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येईल. यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहिल, असा इशारा यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अाहिरे यांच्या वतीने देण्यात आला.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत