सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक
दत्तनगर चुंचाळे परिसरात गुन्हेगारी वाढल्याने अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी या मागणीसाठी अंबड एकस्लो पॉईंट येथुन निघालेला अर्धनग्न मोर्चा गरवारे पॉईन्ट येथे पोलिसांनी अडविला या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी उद्या (बुधवारी) उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पोलिस ठाणे निर्मितीचा विषय मार्गी लावतो असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित केला आहे, परंतु पंधरा दिवसांत पोलिस ठाण्याची निर्मिती झाली नाही तर पुन्हा मुंबई येथे अंबड पासुन पायी अर्धनग्न मोर्चा काढणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, राकेश दोंदे, रामदास दातीर यांनी दिला आहे .
अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी या मागणीसाठी मंगळवारी सकाळी साहेबराव दातीर राकेश दोंदे, रामदास दातीर सह ग्रामस्थ जमा झाले. या नंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्या नंतर अंबड एकस्लो पॉईंट येथुन मुंबई कडे रवाना झाले यानंतर पुढे महामार्गावर गरवारे पॉईन्ट येथे मोर्चेकरांची आ. सीमा हिरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख यांनी भेट घेतली व मोर्चेकरांना चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेले. पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी मोर्चेकरी शिष्टमंडळाशी चर्चा केली. नवीन पोलिस ठाण्याची निर्मितीसाठी काही त्रुटी लागल्या होत्या त्या त्रुटी पुर्ण करून पुन्हा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. या वेळी आ.सीमा हिरे, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख, माजी सभागृह नेते दिनकर पाटील आदी उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98221 17037 / 98228 17037