अन्य

जव्हार मधील पर्यटन खुणावतेय पर्यटकांना;ओले चिंब होऊन अनुभवा जव्हार वारी

Spread the love

अरशद अन्सारी / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार 

               जव्हारला मुक्तहस्ताने रंगांची उधळण करीत निसर्गाने आपले सृष्टी सौंदर्य खुलविले आहे,ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाण,पाऊसळ्यात मुसळधार पाऊस नजर पोहोचेपर्यंत दाट हिरवळ, थंडगार हवा , सोसाट्याचा वारा यामुळे अंग ओलेचिंब भिजून शहारे येतात हे अनुभवताना पर्यटकांना एक वेगळ्या प्रकारचं अकल्पित समाधान मिळत असते. म्हणूनच पावसाळी सहल करण्याचा बेत झाल्यास पर्यटक सर्वप्रथम जव्हार हेच नाव पसंती देत आहेत.

          धबधबा म्हणजे निसर्गाच्या सौदर्याचे प्रतीक,जव्हारला धबधब्याची राजधानी हि म्हणता येईल मुंबई ते ठाणे शहरांपासून पासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या निसर्गनिर्मित पर्यटनस्थळ हे या भागाचे विशेष आकर्षण, या भागात पर्यटक आल्यानंतर येथील स्थानिक नाचणीची भाकरी उडदाचा भुजा आणि मिरचीचा ठेचा गावठी कोंबडा आणि या भागातील डोंगरदऱ्यांत निसर्गनिर्मित उगवत असलेली रान पालेभाज्या ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रुचकर अशी चव आणि आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असणारे सर्व घटक यामुळे या ठिकाणी पर्यटकाला भुरळ पडत  चालली आहे.

                 मुंबई असो नाशिक असो डहाणू पालघर बोईसर अगदी गुजरात या रस्त्यावरून जव्हार कडे मार्गक्रमण करीत असताना उंच उंच टेकड्यावरून छोटे छोटे धबधबे पांढरा शुभ्र रंगात पाहायला मिळतात त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला या भागात उपलब्ध होत असलेले मासे खेकडे घेऊन या भागातील आदिवासी बांधव पर्यटकांना एक वेगळी अनुभूती चाखण्याची संधी देखील देत आहेत.

               तालुक्यात धबधब्यावरती जाण्यासाठी पर्यटकांची विशेष ओढ असते पावसात भिजल्यानंतर गरम गरम जेवण मिळण्याची व्यवस्था आता धबधब्यापासून काही अंतरावर झाली असल्याने पर्यटकांना आपला आनंद लुटण्यासाठी एक वेगळा वाव या तालुक्यात तयार करण्यात आला आहे.

              जव्हार शहरापासून सुमारे १३ कि.मी. अंतरावर असणाऱ्या हिरडपाडा गावात असणारा धबधबा खूप मोठा व उंचीवरून कोसळनारा धबधबा आहे. हा धबधबा जास्त प्रचलित नसल्यामुळे धबधब्या पर्यंत जायला पुरेशी चांगली अशी व्यवस्था नाही. मात्र थोडी पायपीट केली तर नयनरम्य असा हिरडपाडा धबधबा आपणाला पाहायला मिळतो ,हा धबधबा लेंडी नदी वरून पडतो, वर्षा सहली करिता हे एक उत्तम ठिकाण आहे.

               जव्हार शहरापासून 5 किमी अंतरावर असणाऱ्या केळीचा पाडा या गावातून 3 किमी अंतरावर आत गेल्यावर आपणाला ‘ काळमांडवी धबधब्याचे दर्शन होते, काळशेती नदीवरन धबधबा पडत असल्याने या धबधब्याचे नाव “काळमांडवी” असे पडले आहे अतिशय सुंदर अशी निसर्गाची कलाकृती बघायला पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतांना दिसतात , पर्यटक पाण्यात उतरून एन्जॉय करतात , पाऊसळ्यात मातीचा रस्ता असल्याने सरकता होतो. व गावातच वाहने पार्क करून त्या पर्यटन ठिकाणी पोहचावे लागत आहे.

                     जव्हार तालुक्यापासून १७ कि.मी. अंतरावर असलेले नैसर्गिक पर्यटनस्थळ म्हणजे दाबोसा धबधबा. या धबधब्यावर पर्यटकांची झुंबड उडाली असून अनेक पर्यटक नैसर्गिक धबधब्यावर ठाणे, गुजरात, नाशिक, सेलवास, वाडा, विक्रमगड, या ठिकाणाहून डोंगरदरीतील नैसर्गिक धबधबा पाहायला मिळत आहे. त्याचा आनंद घेतांना सुट्टीच्या दिवशी शनिवार, रविवार मोठी गर्दी होतांना दिसत आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- ९८२२११७०३७/९८२२८१७०३७

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत