रवी जगताप / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे दहा ते बारा एकर ऊसाला आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार सदरील उसाच्या शेतावरून महावितरणाची मेन विद्युत लाईन गेलेली असून या विद्युत लाईनच्या स्पार्किंग मुळे आगीची घटना घडली असल्याचे समजते आहे.
तीन ते चार शेतकऱ्यांचा तब्बल दहा ते बारा एकर ऊस जळून खाक झाला आहे, घटनास्थळी पिंपळगाव येथील अग्निशामक दल पोहोचले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आहे. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाला असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शासनाने त्वरित पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037